विशाल गडाची माहिती | Vishalgad Fort Information in Marathi नावाप्रमाणेच विशाल असलेला किल्ला विशाळगड (विशाळगड फोर्ट) कोकणातल्या बंदरांना कोल्हापुरातल्या बाजारपेठेला जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलकिला अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. किल्ले विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.
मलकापूर मार्गे अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो. किंवा संगमेश्वरहून शिपोशी या गावाला जाणाऱ्या गाड्या आहेत. यानंतर शिपोशीहून व्हाया कोचरी गाडी धनगरवाडय़ापर्यंत पोचते. धनगरवाडय़ाहून वर मात्र चालत जावं लागतं. समुद्रसपाटीपासून अंदाजे ५ ते ७ हजार फुट उंचीवर असलेल्या ऐतिहासिक किल्याची उभारणी इ.स. १०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला तो मलीक उत्तुजार. त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९ मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! इ.स. १६६० मधे आदिलशाही सरदार सिद्धी जैहर याने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडले होते. या कोंडीतून शिवराय चतुराईने निसटले. त्याचा पाठलाग करीत सिद्धी मसूद आला. त्या सिद्धी मसूदला थोपवण्याचा महान पराक्रम अजरामर झालेले वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांनी केला. यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून ठेवले.
विशाळगडाची दुरवस्था...!!
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• कोकणातील रहस्यमय शिवकालीन भुयारे
• न्याय: छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असतानाचा हा प्रसंग
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.